Wednesday, November 19, 2008

खावयाऽऽऽऽऽऽ कधी गं देशील तू??

दिवसामागुनि दिवस चालले ऋतू मागूनि ऋतू, खावऽऽऽऽया, कधी गं देशील तूऽऽऽऽ? खावऽऽऽऽया, कधी गं देशील तूऽऽऽऽ? खावऽऽऽऽया, कधी गं देशील तूऽऽऽऽ??????????

एकांतात स्वरसाधना करताना या गीताचा षड्ज अस्स्सा लागतो, की काय म्हणावं, म्हाराजा!!! हा षड्ज भूक, चव, सुगंध, जीभ, मेंदू आणि ह्रदय या सहा स्थानांवरून जन्मतो म्हणून तो षड+ज हे सुद्धा सांगितिक दॄष्टीकोनातून मी आपणास सांगत आहे( न विचारले तरीही.. :P) ...... आता समेवर येतो, या गाण्याचा या प्रसंगी संदर्भ घेण्याचे कारण एकचि असे ते म्हणजे ही आमची "स्वतःची रचना" !!!!!!!!!!!!!!!!!!! hmmm... हसलात ना कुत्सितपणेऽऽऽ???????????????????? माझ्या या भाबड्या पण सरळ वचनांवर विश्वास नाही नं तुमचाऽऽऽ?????????????????? पुन्हा एकदा जीभेस साक्षी ठेवून सांगतो की हे गीत माझे "स्वरचित" असे काव्य आहे!!!!!!!!!

माझी फार पंचाईत होते आजकाल... स्वगत असे काही लिहावयाचे असे म्हटले की तुम्ही लगेच म्हणता की दिवाकरांची नक्कल केली! बरे, भावगर्भ चिंतन काही लिहो गेल्यास म्हणता की वपुंच्या घरची चोरी केली! बरे, सेवटीं बखर प्रमाण मानोनिया कलम दौतीत बुडवावी ऐसे म्हणता तुमचे जासुद आम्हाकडे इतिहासकारांची सनद चोरलेप्रमाणे पाहतात!
"तेव्हा म्या बापुड्या जीवे! नेमके काय करावे???"... पहा सहज लिहो गेले तरी कविता प्रसवली! आता इथे कविता या शब्दाचा श्लेश नाही हे तरी माझे बापुडवाणे बोल आपण स्वीकाराल की नाही??????? असोऽऽऽ

भारतीय संस्कॄती असं म्हणते की असा एकही साहित्यप्रकार नाही किंवा असं एकही पात्र नाही जे "महाभारताच्या महानाट्यात व्यासांना सुचलं नाही!" व्यासोच्छिष्टं जगत्सर्वं असं आमच्या संस्कृतच्या आचार्यांनी आम्हास शालेय जीवनात अध्यापिले होते. त्यामुळे कुठलेतरी साहित्य कुठेतरी वाटते एकसारखे? पण याचा अर्थ असा आहे काय की आपण आम्हावर चक्क साहित्यचौर्याचा आरोप करावा?????? प्राक्तनाच्या ताटात नेहेमीच कार्ल्याची भाजी जरी असली तरी एक गोष्ट खरी की चव भाजीत नाही तर जीभेत असते!!!!!!!!!!!!!!!! असोऽऽऽ
सध्या तरी रियाज करायचा आहे.. मला गावू द्यात. तुम्हास नंतर ऐकवतो..
"खावयाऽऽऽऽऽऽ कधी गं देशील तू?"खावयाऽऽऽऽऽऽ कधी गं देशील तू??"खावयाऽऽऽऽऽऽ कधी गं देशील तू????

No comments: