



नशीब ज्याचे त्याचे..

मुंबईत पाव-ला पाव-ला वर वडापाव मिळतो. वडा या विषयाचे इतिहासाच्या अनुषंगाने चिंतन केले तर जाणवेल की हा पदार्थ बेसन आणि बटाटा यांचा मध्य-अर्वाचीनकाळात प्रादुर्भाव झाला आणि जेव्हा वन-मानव नुकताच शेती करू लागला होता आणि त्याला तळणे या क्रियेचा अपघाताने शोध लागला होता, त्या काळी मानवाच्या जीवनात आला. पाकशास्त्राच्या शोधनिबंधासाठी या माहितीचा उपयोग करणे असेल तर विनासंकोच संपर्क करावा.


कल्पना करा की एक वडा आपल्यापासून दोन प्रकाश-वर्षे दूर आहे आणि तो दुर्बिणीत दिसला तर प्रकाशाच्या वेगाने गेल्यास आपण दोन वर्षांनी तिथे पोहोचू ...... अर्थात दुर्बिणीत आज दिसणारा , या उदाहरणातला वडा दोन वर्षांपूर्वीचा असून पॄथ्वीवर आज दिसतो, तात्पर्य तो शिळा आहे. असेच कांही प्रयोग आता चंद्रावर करून पहाण्याने मानवजातीचे दुःख हरण होईल असे आमचे वि, नि. का.(विज्ञाननिष्ठ काका)म्हणतात..

No comments:
Post a Comment